बा….. पेटविलेस पाणी, पेटविलेस रक्त, पेटवीलेसअनैतिक धर्मरुढींची विषवल्ली धर्मग्रंथ…! जाळलास या भुमीतला विषम अन्यायकारक अज्ञानी कुजकट विचांरांचा गावगाडा, असमान,हीनकस अमानुष अर्थहीन कोंडवाडे, अनादीकाळाची तोडुन बेडी, दुबळ्या, गतगात्र निर्विकार ,निशब्द मनांना नवचेतना देत साकारलीस नव प्रकाश किरणे, धर्ममार्तडांच्या विषवल्लीला लाथ मारत,ठोकरलीस, नाकारलीस अन झिडकारलीस क्रृर पिढ्यांनपिढ्यांची गुलामगीरी अन् घेवु दिलास नव्या […]
दिवस: मार्च 18, 2018
औरंगाबाद शहर सध्या कचर्याच्या प्रश्नाने चर्चेत आहे.कचरा धुमसावा तसे वातावरण फार धुमसत चालले आहे.नुकतेच पोलिसांनी ही स्वच्छता अभियान राबविले.यात वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनीही सहभाग घेतला. खरतर समाजात खल,दंगे,गुन्हे आदि रोखुन शांती अन सुरक्षा बहाल करण्याची जबाबदारी असणार्या या जनतेच्या रक्षकांनी स्वच्छता अभियान राबवुन आपण समाजात नवा पायंडा आदर्श निर्माण केला आहे.