.
अभिनंदन !!
शेतमजुराचा मुलगा गिरीश बडोले राज्यात पहिला
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) सगळीकडूण होतेय अभिनंदन !!
शेतमजुराचा मुलगा गिरीश बडोले राज्यात पहिला! .
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून उस्मानाबादमधील गिरीश बडोलेने महाराष्ट्रातून पहिला तर देशात विसावा क्रमांक पटकावला आहे.
गुणवत्ता यादीत ९९० विद्यार्थी
गुणवत्ता यादीत एकूण ९९० परीक्षार्थींचा समावेश आहे. त्यात ४७६ विद्यार्थी खुल्या प्रवर्गातील, २७५ विद्यार्थी इतर मागासवर्गीय, १६५ विद्यार्थी अनुसूचित जाती आणि ७४ विद्यार्थी अनुसूचित जमातीतील आहेत.
गिरीश बडोलेचे वडील शेतमजूर आहेत. त्यांची दोन एकर शेतजमीन आहे. गिरीशचा एक भाऊ मेकॅनिकल इंजीनियर आहे. गिरीशचं दुसरीपर्यंतचं प्राथमिक शिक्षण कसगीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तर तिसरी आणि चौथीत तो कासार शिरसी येथील कारीबसवेश्वर विद्यालयात होता. त्याने तुळजापूर येथील सैनिकी विद्यालय माध्यमिक शिक्षण घेतलं. दयानंद विद्यालय लातूर येथे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो मुंबईत आला. मुंबईतील जे. जे. मेडिकल कॉलेजमधून त्याने एम. बी. बी. एस. पदवी घेतली.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातील १६ विद्यार्थी यशवंत ठरले आहेत.
यात गिरीश बडोले (२०), दिग्विजय बोडके (५४), सुयश चव्हाण (५६), भुवनेश पाटील (५९), पियुष साळुंखे (६३), रोहन जोशी (६७), राहुल शिंदे (९५), मयुर काटवटे (९६), वैदेही खरे (९९), वल्लरी गायकवाड (१३१), यतिश विजयराव देशमुख (१५९),रोहन बापूराव घुगे (२४९), श्रीनिवास वेंकटराव पाटील (२७५), प्रतिक पाटील (३६६), विक्रांत सहदेव मोरे (४३०), तेजस नंदलाल पवार (४३६) या परीक्षार्थींचा समावेश आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा २८ ऑक्टोबर २०१७ रोजी घेण्यात आली होती.) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून उस्मानाबादमधील गिरीश बडोलेने महाराष्ट्रातून पहिला तर देशात विसावा क्रमांक पटकावला आहे.
गुणवत्ता यादीत ९९० विद्यार्थी
गुणवत्ता यादीत एकूण ९९० परीक्षार्थींचा समावेश आहे. त्यात ४७६ विद्यार्थी खुल्या प्रवर्गातील, २७५ विद्यार्थी इतर मागासवर्गीय, १६५ विद्यार्थी अनुसूचित जाती आणि ७४ विद्यार्थी अनुसूचित जमातीतील आहेत.
गिरीश बडोलेचे वडील शेतमजूर आहेत. त्यांची दोन एकर शेतजमीन आहे. गिरीशचा एक भाऊ मेकॅनिकल इंजीनियर आहे. गिरीशचं दुसरीपर्यंतचं प्राथमिक शिक्षण कसगीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तर तिसरी आणि चौथीत तो कासार शिरसी येथील कारीबसवेश्वर विद्यालयात होता. त्याने तुळजापूर येथील सैनिकी विद्यालय माध्यमिक शिक्षण घेतलं. दयानंद विद्यालय लातूर येथे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो मुंबईत आला. मुंबईतील जे. जे. मेडिकल कॉलेजमधून त्याने एम. बी. बी. एस. पदवी घेतली.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातील १६ विद्यार्थी यशवंत ठरले आहेत. यात गिरीश बडोले (२०), दिग्विजय बोडके (५४), सुयश चव्हाण (५६), भुवनेश पाटील (५९), पियुष साळुंखे (६३), रोहन जोशी (६७), राहुल शिंदे (९५), मयुर काटवटे (९६), वैदेही खरे (९९), वल्लरी गायकवाड (१३१), यतिश विजयराव देशमुख (१५९),रोहन बापूराव घुगे (२४९), श्रीनिवास वेंकटराव पाटील (२७५), प्रतिक पाटील (३६६), विक्रांत सहदेव मोरे (४३०), तेजस नंदलाल पवार (४३६) या परीक्षार्थींचा समावेश आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा २८ ऑक्टोबर २०१७ रोजी घेण्यात आली होती.
-बाबा गाडे
संपादक महानायक औरंगाबाद