रत्नागिरी:
सतत पाठपुरावा करून ही आणि राज्यात भाजप सेनासत्तेत असूनही कोकणात मरण स्वस्त होत आहे ।.सर्वात जास्त सेनेचे आमदार ,खासदार आणि मंत्री या भागातून निवडून येतात मात्र त्यांचा स्थानिक प्रश्नांची दखल फार क्वचितच घेतली गेली आहे .
कोकणातील सर्व गावे ही रस्त्याने जोडली आहेत .कधी काळी बनवलेले हे रस्ते आता कधीच खराब झालेतब.मुंबई गोवा या महामार्ग ही त्यातून सुटला नाही कित्येक अपघात या महामार्गावर सतत होत असतात .यात कोकणातील महामार्गावरील घाटातील वळणदार आणि अरुंद वळणे अपघाताची कारणे होतात त्यातीलच हे आज नायरी निवळी घाटात एसटी बसचा भीषण अपघात झाला. एसटी बसने तीन वेळेस पलटी मारल्याने अपघातग्रस्त झाली. या अपघातात सुमारे ३५ प्रवासी जखमी झाले असून एक महिला गंभीर जखमी आहे. बसमध्ये १५ हून अधिक शालेय विद्यार्थी प्रवास करत होते.
जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देवरुख आगाराची ही एसटी सकाळी ५.४५ वाजता निवळीहून संगमेश्वर येथे जाण्यासाठी निघाली होती. कापाच्या वाडीजवळील घाटातील धुक्यामुळे बस चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यातच गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला आहे. या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले.
स्थानिक आमदार ,प्रशासन यावर लक्ष देतील कोकणातील महामार्गाचे रुंदीकरणाचे काम अत्यंत धीम्या गतीने चालू आहे .सन वारी ला येणारा मुंबई कर चाकरमानी याचे बळी जातात.
लवकरच प्रशासन याचा विचार करेल अशी स्थानिक जनता मागणी करीत आहे .
-प्रमोद जाधव
wwww.ambedkaree.com