रत्नागिरी – नायरी निवळी घाटात एसटी बसचा भीषण अपघात.वळणदार रस्ते……कोकणात मरण झालेय स्वस्त..प्रशासन सुस्त.

रत्नागिरी:

सतत पाठपुरावा करून ही आणि राज्यात भाजप सेनासत्तेत असूनही कोकणात मरण स्वस्त होत आहे ।.सर्वात जास्त सेनेचे आमदार ,खासदार आणि मंत्री या भागातून निवडून येतात मात्र त्यांचा स्थानिक प्रश्नांची दखल फार क्वचितच घेतली गेली आहे .
कोकणातील सर्व गावे ही रस्त्याने जोडली आहेत .कधी काळी बनवलेले हे रस्ते आता कधीच खराब झालेतब.मुंबई गोवा या महामार्ग ही त्यातून सुटला नाही कित्येक अपघात या महामार्गावर सतत होत असतात .यात कोकणातील महामार्गावरील घाटातील वळणदार आणि अरुंद वळणे अपघाताची कारणे होतात त्यातीलच हे आज नायरी निवळी घाटात एसटी बसचा भीषण अपघात झाला. एसटी बसने तीन वेळेस पलटी मारल्याने अपघातग्रस्त झाली. या अपघातात सुमारे ३५ प्रवासी जखमी झाले असून एक महिला गंभीर जखमी आहे. बसमध्ये १५ हून अधिक शालेय विद्यार्थी प्रवास करत होते.
जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देवरुख आगाराची ही एसटी सकाळी ५.४५ वाजता निवळीहून संगमेश्वर येथे जाण्यासाठी निघाली होती. कापाच्या वाडीजवळील घाटातील धुक्यामुळे बस चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यातच गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला आहे. या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले.

स्थानिक आमदार ,प्रशासन यावर लक्ष देतील कोकणातील महामार्गाचे रुंदीकरणाचे काम अत्यंत धीम्या गतीने चालू आहे .सन वारी ला येणारा मुंबई कर चाकरमानी याचे बळी जातात.

लवकरच प्रशासन याचा विचार करेल अशी स्थानिक जनता मागणी करीत आहे .
-प्रमोद जाधव
wwww.ambedkaree.com

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

आंबेडकरी विचारांना व भूमिकांना दडपणारा नाझिवाद .....! -भिम आर्मीच्या चंद्रशेखर आझाद याना अटक

शनी डिसेंबर 29 , 2018
Tweet it Pin it Email ज्या महामानावांच्या लेखणीने तमाम भारताला लोकशाही प्राप्त झाली त्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयाना सरकार आपल्या मर्जी नुसार वाटेल तो अन्याय करून आपण कसे नाझीवादी आहोत हे सिद्ध करत आहे . भीमा कोरेगाव विजय दिवस केवळ काही तासांवर येऊन ठेपला आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या […]

YOU MAY LIKE ..